या जगामध्ये अनेक संस्कृतीचा उदय आणि विकास झाला तसेच त्या काळासोबत लयालाही गेल्या. भारतीय संस्कृती जगातील अतिशय प्राचीन आणि श्रेष्ठ संस्कृती आहे. ती लौकिकता, अर्धभौतिकता आणि भोगवादाच्याऐवजी आध्यात्मवाद आणि आत्मत्त्वाच्या भावनेवर केंद्रित आहे, जिचे मूळ ध्येय शांतता, सहिष्णुता, एकता, सत्य, अहिंसा आणि सदाचरण यासारख्या मानवी मूल्यांची स्थापना करून संपूर्ण विश्वाची आध्यात्मिक प्रगती करणे आहे. तिच्यामध्ये सर्वांच्या सुखासाठी तसेच सर्वांच्या हिताचे कार्य करण्यासाठी संपूर्ण विश्वाला आपले कुटुंब समजण्याची भावना अंतर्निहित आहे. याच कारणामुळे आपल्या सांस्कृतिक आणि जीवन मूल्यांच्या बळावर भारतीय संस्कृती हजारो हजारो वर्षानंतरही मूळ रुपात जशीच्या तशी राहूण अक्षय झाली आहे. स्वच्छंदता आणि स्वार्थांधतेपेक्षा वेगळे असे तिच्यामध्ये न्याय, उदारता, परहीत आणि त्याग यासारख्या चारित्र्यविषयक गुणांच्या आधारावर आदर्श जीवन जगण्याची आणि जगातील मानवजातीला एका सूत्रात बांधण्याची शक्ती आहे. खऱ्या अर्थाने मानवी जीवन सार्थक करण्याचा मूळमंत्र भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीतील धारणा आणि पंरपरा कोणत&